वसुंधरेचे रक्षण हे प्रत्येकाचे कर्तव्य: न्या. विक्रम आव्हाड

    दिनांक :25-Apr-2024
Total Views |
सडक अर्जुनी,
Vikram Avhad पृथ्वी एकमेव असा ग्रह आहे. ज्यावर सजीवांसाठी योग्य वातावरण असल्याने जीवसृष्टी आहे. मानव केवळ मनुष्य जातीच्या स्वार्थाकरीता, भौगोलीक सुखाच्या हव्यासापायी नैसर्सिक साधन संपत्तीचा नाश करत आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगसारख्या समस्या उग्र रूप धारण करत आहेत. त्यामुळे निसर्ग व मानवामध्ये संतुलन राखण्यासाठी व पृथ्वीवर मनुष्याचे अस्तित्व टिकविण्यासाठी वसुंधरेचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश व तालुका विधी सेवा समिती सडक अर्जुनीचे अध्यक्ष डॉ. विक्रम अं. आव्हाड यांनी केले.   गोटानपार घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा द्या :अर्चना मडावी
 


vasundhara 
 
येथील दिवाणी न्यायालयात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. डी. एस. बन्सोड, अ‍ॅड. एस. बी. गिर्‍हेपुंजे, अ‍ॅड. आर. के. लंजे प्रामुख्याने उपस्थित होते. न्या. आव्हाड पुढे म्हणाले, आजच्या प्रगतीशिल जगात विकासाच्या नावाखाली वृक्षतोड, शेतीत रासायनिक खताचा अतिवापर, भूगर्भातील पाण्याचा अतिउपसा, औद्योगीककरणामुळे निर्माण होणारे विषारी वायू, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी पारंपारीक उर्जा संसाधनांवर पडणारा भार यांचा पर्यावरणावर परीणाम होवून त्याचा विपरीत परिणाम पृथ्वीवर होत आहे.Vikram Avhad त्यामुळे पृथ्वीच्या रक्षणासाठी विविध उपाययोजना राबवून पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी शासन, प्रशासनासह प्रत्येकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. कार्यक्रमाला अ‍ॅड. एम. एस. रामटेके, अ‍ॅड. सी. पी. शंभरकर, अ‍ॅड. एम. ए. बसोड, अड. व्ही. डी. रहांगडाले, न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक एन. जे. लांजेवार तसेच सर्व न्यायालयीन कर्मचारी आणि पक्षकार उपस्थित होते. आयोजनासाठी वकील संघ व न्यायालयीन कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.