बिहारमध्ये विषारी दारूने 24 जणांचा मृत्यू

    दिनांक :17-Oct-2024
Total Views |
सिवान,
toxic liquor in Bihar बिहारमधील सिवानमध्ये विषारी दारू पिल्याने मृतांची संख्या 20 झाली आहे. जिल्ह्याचे एसपी अमितेश कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे. त्याचबरोबर छपरामध्येही विषारी दारू पिल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे. सिवान आणि छपरा येथे विषारी दारू प्यायल्याने एकूण 24 जणांना जीव गमवावा लागला आहे. सुमारे 20 ते 25 लोक अजूनही आजारी आहेत. यातील बहुतांश जणांवर सिवानच्या सदर रुग्णालयात तर काहींवर छपरा येथे उपचार सुरू आहेत. तर काहींना पाटणा येथे रेफर करण्यात आले आहे. दरम्यान, छपराचे पोलीस अधीक्षक कुमार आशिष यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे. तीन जणांना अटक करण्यात आली असून आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा : उत्तर कोरिया 'शत्रू राष्ट्र' म्हणून घोषित !
 
 
durds
 
याशिवाय स्थानिक चौकीदार आणि पंचायतीला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाही निलंबित करण्यात आले आहे. विभागीय कारवाईचा एक भाग म्हणून मशरक पोलिस स्टेशनचे प्रभारी आणि मशरक क्षेत्राचे ALTF प्रभारी यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. toxic liquor in Bihar जिल्हा दंडाधिकारी मुकुल कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवानपूर पोलिस स्टेशन आणि भगवानपूर पोलिस स्टेशनचे एएसआय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. विषारी दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. आरजेडी नेते मृत्युंजय तिवारी म्हणतात की विषारी दारू प्यायल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दारूबंदी कायदा असतानाही बिहारमध्ये दरवेळी विषारी दारू पहायला मिळते, विषारी दारूमुळे लोकांचा मृत्यू कसा होतो, ही अत्यंत खेदाची आणि चिंतेची बाब आहे.