'भारतात मुस्लिमांना अस्पृश्य बनवण्यात आले'

AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

    दिनांक :20-Oct-2024
Total Views |
नवी दिल्ली,
Asaduddin Owaisi : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी त्यांच्या X हँडलवर मुस्लिमांशी संबंधित पोस्ट केली आहे. ते म्हणाले, 'भारतात मुस्लिमांना अस्पृश्य बनवण्यात आले आहे. उत्तराखंडमधील चमोली येथे 15 मुस्लिम कुटुंबांवर सामूहिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. मुस्लिमांना 31 डिसेंबरपर्यंत चमोली सोडावी लागेल, अशी धमकी चमोलीच्या व्यापाऱ्यांनी दिली आहे. जर जमीनदारांनी मुस्लिमांना घरे दिली तर त्यांना 10,000 रुपये दंड भरावा लागेल.
 

MUSLIM
 
ओवेसी म्हणाले, 'हे तेच उत्तराखंड आहे जिथे सरकार समानतेच्या नावाखाली समान नागरी संहिता लागू करत आहे. चमोलीच्या मुस्लिमांना समानतेने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार नाही का? मोदी अरब शेखांना मिठी मारू शकतात तर चमोलीच्या मुस्लिमांनाही मिठीत घेऊ शकतात. शेवटी मोदी हे सौदी किंवा दुबईचे नव्हे तर भारताचे पंतप्रधान आहेत.