केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! म्हणाले ," ही बंदी आम्ही उठवत आहोत "
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यात सहभागी होण्यावरील बंदी उठवली
दिनांक :22-Jul-2024
Total Views |
नवी दिल्ली,
केंद्र सरकारने सरकारीCentral government कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यावरील बंदी उठवली आहे. 7 नोव्हेंबर 1966 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यक्रमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागावर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. हा आदेश दिल्लीतील गोरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आला आहे, ज्यामध्ये अनेक संत आणि गोभक्त मारले गेले होते.
हेही वाचा : भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक श्रीजेशने केली निवृत्ती जाहीर केंद्र सरकारने सरकारीCentral government कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-आरएसएसच्या कार्यात सहभागी होण्यावरील बंदी उठवली आहे. मोदी सरकारने 58 वर्षांपूर्वी जारी केलेला हा असंवैधानिक आदेश मागे घेतला असल्याचं भारतीय जनता पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे. हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडसह अनेक राज्य सरकारांनी याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांवर आरएसएसमध्ये सामील होण्यावरील बंदी उठवली आहे.
इंदिरा गांधी पंतप्रधान केव्हा झाल्या?
इंदिराCentral government गांधी 1966 ते 1977 पर्यंत सतत पंतप्रधान होत्या. त्यानंतर, 1980 ते 1984 मध्ये त्यांच्या राजकीय हत्येपर्यंत त्या देशाच्या पंतप्रधान होत्या. त्या भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान होत्या. इंदिराजींना सप्टेंबर 1967 ते मार्च 1977 पर्यंत अणुऊर्जा मंत्री करण्यात आले. 5 सप्टेंबर 1967 ते 14 फेब्रुवारी 1969 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. इंदिराजींनी जून 1970 ते नोव्हेंबर 1973 पर्यंत गृह मंत्रालय आणि जून 1972 ते मार्च 1977 पर्यंत अंतराळ मंत्रालयाचा कार्यभार सांभाळला. जानेवारी 1980 पासून त्या नियोजन आयोगाच्या अध्यक्षा होत्या.