तेव्हा जिना, आता ओवेसी ठरणार देशाच्या दुसऱ्या फाळणीचे कारण!

    दिनांक :06-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली , 
Owaisi and second division भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गिरीराज सिंह यांनी तर 1947 मधील मोहम्मद अली जिना यांच्याप्रमाणेच ओवेसीही भारताची दुसरी फाळणी करून देतील असे म्हटले आहे. असदुद्दीन ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात, असा आरोप गिरीराज सिंह यांनी केला आहे. गिरीराज ओवेसींबद्दल आणखी काय म्हणाले ते जाणून घेऊया. केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह वेळोवेळी AIMIM खासदार ओवेसी यांच्यावर हल्लाबोल करत असतात. शुक्रवारी गिरिराज सिंह म्हणाले की, ओवेसी कायद्याच्या विरोधात बोलतात आणि प्रक्षोभक वक्तव्य करतात. जिना यांच्यानंतर ओवेसी भारताच्या दुसऱ्या फाळणीचे नेतृत्व करतील. गिरीराज सिंह म्हणाले की, भारताच्या फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तान आणि बांगलादेशात राहिले. दोन्ही देशांमध्ये त्यांच्यासोबत अनेक घटना घडल्या पण ओवेसी यांनी या गोष्टीचा कधी निषेध केला नाही. पाकिस्तान किंवा बांगलादेश असता तर ओवेसींचा आवाज आतापर्यंत दाबला गेला असता, असे गिरीराज म्हणाले.
 
wed
गिरीराज सिंह म्हणाले की, जेव्हा आपण एनआरसीबद्दल बोलतो तेव्हा राहुल गांधी विरोध करतात पण हिमाचलमधील काँग्रेस सरकार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सभागृहात काँग्रेसचे मंत्री म्हणत आहेत की त्याची चौकशी झाली पाहिजे आणि लोकांना त्याचे प्रमाणपत्र दिले पाहिजे NRC असायला हवे. NRC फक्त बिहारच्या 4 जिल्ह्यांनाच नाही तर संपूर्ण बिहार आणि देशात आवश्यक आहे. एनआरसी लागू न केल्यास भारतीयांचा नाश होईल. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह म्हणाले की, काँग्रेस सरकारने वक्फ बोर्डाला कोणतीही जमीन बळकावण्याचा अधिकार दिला होता. याचा दाखला हिमाचल प्रदेशचे मंत्री विधानसभेत देत आहेत. वक्फ बोर्डाची मालमत्ता कशी वाढत आहे? वक्फ बोर्डाने आपली मालमत्ता असल्याचा दावा केल्याने रेल्वे विभागाचे अनेक प्रकल्प रखडले होते. वक्फ बोर्डाची गुंडगिरी थांबली पाहिजे, असे गिरीराज म्हणाले. हेही वाचा : आणि 'तिच्या' पायात स्केटिंग राहिल्या...मनाला हादरविणारे फोटो!