कृष्णनीतीच श्रेयस्कर !

25 Oct 2023 20:11:27
प्रासंगिक 
- डॉ. विवेक राजे
 
al-aqsa-war-gaza जगाच्या इतिहासात धर्मयुद्ध फक्त एकदाच लढले गेले. तेही या जम्बुद्वीपावर लढले गेले. जग त्या धर्मयुद्धाच्या इतिहासाला आज महाभारत म्हणून ओळखते. या विश्वात मानवाच्या कल्याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. al-aqsa-war-gaza सनातन म्हणजे अक्षय आहेत, त्रिकालाबाधित आहेत. हजारो वर्षांपूर्वी हे नियम मानवाच्या कल्याणासाठी तयार केले गेले. ते आजही जसेच्या तसे लागू आहेत. जेव्हा हे नियम तोडून फक्त आपला आणि आपल्या मुलांचा हट्टी स्वार्थ साधण्याचा आंधळा खेळ सातत्याने खेळला जाऊ लागला, अधर्म केला जाऊ लागला, तेव्हा भगवंताने स्वतःच्या नजरेखाली घडवून आणले ते युद्ध म्हणजे धर्मयुद्ध! al-aqsa-war-gaza अर्थात महाभारत युद्ध होय. या युद्धातदेखील संसाधनांची मालकी किंवा जमिनीची मालकी हा कळीचा मुद्दा होता. मात्र मालकी हक्क कशाप्रकारे मिळवावा हा तात्त्विक व अधिक महत्त्वपूर्ण मुद्दा होता, असे म्हणता येईल. या सगळ्या इतिहासात ज्याने ज्याने अधर्म केला, शाश्वत नियमांचे पालन केले नाही, त्या प्रत्येकाला भगवंताने शिक्षा केली, तेही त्या प्रत्येकाचे पाप, त्याच्या त्याच्या पदरात टाकत. al-aqsa-war-gaza या युद्धात भगवंताने सापेक्षनीतीचा व्यवहार्य वापर कसा करावा, याचे पाठ हिंदू समाजाला गिरवायला दिले.
 
 

al-aqsa-war-gaza 
 
 
परंतु, दुर्दैवाने या सापेक्षनीतीचे पाठ आमचा हिंदू समाज एकत्रितरीत्या तसेच वैयक्तिकरीत्यादेखील विसरत असतो, असेच म्हणावे लागते. या पृष्ठभूमीवर अनेक घटना हिंदू समाजाने लक्षात घेतल्या पाहिजेत. al-aqsa-war-gaza एक कोणी मुहम्मद रिझवान नावाचा फडतूस पाकिस्तानी क्रिकेटर, भारतात होत असलेल्या विश्व कप क्रिकेट स्पर्धेत त्याने श्रीलंकेविरुद्ध हैदराबाद येथे ठोकलेले शतक हमासला समर्पित करतो. कोणत्या तरी सामन्यात भरमैदानावर कोणी क्रिकेटपटू नमाज पठन करतो. याच हैदराबाद येथे सदर सामन्याच्या दरम्यान ‘पाकिस्तान जितेगा’ म्हणून नारे लागतात. यावर पाकिस्तानमध्ये बसून कोणी एक माजी क्रिकेटपटू हैदराबाद हे महत्त्वाचे मुस्लिम केंद्र आहे; त्यामुळे मुस्लिम पाकिस्तानची तेथील मुसलमान नेहमीच पाठराखण करतात, अशी मल्लिनाथी करतो. al-aqsa-war-gaza आमच्याच देशातील कुणी स्वरा भास्कर नावाची नटी (हो नावाचीच नटी आहे ती!) ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनवर किती अत्याचार केले म्हणून भारतात गळे काढते. अगदी आठ-नऊ वर्षांपूर्वी या देशात सत्ताधारी असलेली तथाकथित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, देशाच्या पंतप्रधानांनी जागतिक आणि राष्ट्रीय व्यूहरचनेचा विचार करून इस्रायलला आधीच पाठिंबा दिलेला असतानाही, हमास या पॅलेस्टाईन आतंकवादी संघटनेला पाठिंबा देणारा ठराव पारित करते. al-aqsa-war-gaza एवढे सगळे होऊनही आमच्यातले काही जण इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामागे राजनैतिक कारणे कमी आणि धार्मिक तेढ, धार्मिक अहंभाव जास्त आहे, हे लक्षात घेण्यात कमी पडतात.
 
 
 
अल अक्सा मशीद इस्लामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मक्का-मदिनेनंतरची ही महत्त्वपूर्ण जागा आहे. खरं तर याच प्रदेशातून इस्लाम, यहुदी व ख्रिस्ती हे तीनही अब्राहमिक धर्म स्थापन झाले आहेत. आणि त्यामुळेच या तीनही धर्मांना एकमेकांविषयी प्रचंड द्वेष आहे. याच्या पाठीशी तीनही धर्मांच्या अंतःकरणातील असुरक्षिततेची भावना आहे. al-aqsa-war-gaza आपला धर्म जीवनपद्धती म्हणून, सशक्त तत्त्वज्ञान म्हणून चिरंतन अस्तित्व राखू शकत नाही, ही या मागील खरी जाणीव होय. त्यामुळे बरीच सरमिसळ असूनही हे तीनही धर्म एकमेकांना इतिहास काळापासून पाण्यात पाहतात. यातूनच आपला धर्म इतरांवर लादण्याची वाईट प्रवृत्ती यातील दोन धर्मांनी जोपासली आहे तर तिसरा धर्म म्हणजे यहुदी धर्म असे समजतो की, त्यांचा वंश हा देवाने निवडलेला वंश आहे आणि जे निवडलेले किंवा निवडक वा विशेष लोक असतात ते उगाच अवाजवी गर्दी गोळा करीत नाहीत. यामुळे ज्यू किंवा यहुदी लोक धर्म प्रसार करीत नाहीत; किंबहुना इतरत्र जन्म घेतलेल्यांना यहुदी आपल्या धर्मात स्वीकारत नाहीत. त्यांच्याकरिता त्यांचा वंश हाच त्यांचा धर्म आहे. al-aqsa-war-gaza याचा एक परिणाम म्हणजे यहुदी धर्मीयांची संख्या त्यामुळेच अत्यंत मर्यादित राहिली आहे.
 
 
तर, दुसरा परिणाम म्हणजे स्वतःला अत्यंत उन्नत असा वंशधर्म मानल्यामुळे हे नेहमीच इतर मानव समूहांशी फटकून वागताना दिसतात. त्यामुळे सगळे व्यवहार ते शक्यतोवर आपल्याच धर्मीयांबरोबर करण्याचा प्रयत्न करीत असतात व इतर धर्मीयांशी अत्यंत निष्ठुरतेने, कपटाने, हीन स्तरावर आणि अपमानास्पदरीतीने वागताना दिसतात. या सगळ्या पृष्ठभूमीवर हिटलर जरी जर्मनीतील ज्यूंच्या हत्याकांडासाठी बदनाम केला गेला असला, तरी मुळात ते ख्रिश्चनांनी ज्यूंचे केलेले हत्याकांड होते, हे लक्षात घेतले पाहिजे. al-aqsa-war-gaza या तीनही धर्मांमध्ये आपसात द्वेष, वैरभाव आहेच; याशिवाय जगात अस्तित्वात असलेल्या इतर धर्मांचादेखील ते द्वेषच करतात. धार्मिक द्वेष हे एक कारण झाले. दुसरे कारण म्हणजे या दोन धर्मांना या पृथ्वीवरील जास्तीत जास्त जमीन आपल्या आधिपत्याखाली हवी आहे आणि होती. यहुदी मात्र स्वतःला उच्च समजून इतर धर्मीयांच्या प्रति निश्चितपणे अनुदार असतात. यापैकी दोन धर्मांना केवळ आपलेच लोक या पृथ्वीवर हवे आहेत. इतर धर्मीयांनी एक तर यांचा धर्म स्वीकारावा, परागंदा व्हावे किंवा मरून जावे, अशीच या धर्मांची शिकवण आहे. al-aqsa-war-gaza इतर धर्मीयांना जगण्याचा अधिकार नाही अशीच यांची विचारसरणी होय. ही पृथ्वी आपल्या सर्व प्राणिमात्रांसाठी आहे. आपण सगळे इथे मिळून मिसळून गुण्यागोविंदाने राहू शकतो, हा विचार अब्राहमिक धर्मांमध्ये नाही. त्यामुळे सगळ्या जगाला हे धर्म गुलाम करण्याची मानसिकता जोपासताना दिसतात.
 
 
आम्ही तुमचे कल्याण करण्यासाठी इथे आलो, तुम्हाला शिकवण्यासाठी आलो, या आणि अशी धादांत खोटी वचने हे धर्म यांच्या जन्मापासूनच देताना दिसतात. या तिन्ही धर्मांची अहमन्यता किंवा धर्मांधता वरील विवेचनावरून लक्षात येते. यावर हिंदू समाजाने आज कोणती दिशा घेऊन मार्गक‘मणा केली पाहिजे, यावर विचारमंथन गरजेचे आहे. al-aqsa-war-gaza जर मध्य पूर्वेतील धार्मिक कट्टरतेला आवर घालण्यासाठी किंवा इस्लामिक (रॅडिकल) कट्टरपंथी गटांना संपवण्याचा हा प्रयत्न असेल तर गाझा पट्टी रिकामी करून, हमासला गाझातच संपवण्याचा प्रयत्न राहील. त्याच वेळी तालिबान, इसिस, अल कायदा यांचेदेखील कंबरडे मोडण्यासाठी जागतिक शक्ती प्रयत्नशील राहतील. कारण त्यांनीच तयार केलेला आतंकी संघटनांचा भस्मासुर आता युरोपियन देश आणि पर्यायाने अमेरिकेच्या गळ्यापर्यंत आला आहे. भारत देशाने मग या स्थितीत, आपली डोकेदुखी दीर्घकाळ शांत राहील, याची तजवीज केलीच पाहिजे. या सगळ्या गोष्टी कशा घडवून आणल्या जातात, हे पाहण्यासारखे असणार आहे.al-aqsa-war-gaza  कदाचित आपण सगळेच जण एका ऐतिहासिक घडामोडींच्या कालखंडाचे साक्षीदार होऊ. पण हिंदू समाज म्हणून आपल्या या सगळ्या घडामोडींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे लागणार आहे. भारत देश आणि हिंदू समाजाला बाहेरून आतंकवादी अथवा लष्करी धोका आज तरी दिसत नाही.
 
 
या सगळ्या परिस्थितीत जर जागतिक महायुद्ध झालेच तर त्याचा केंद्रबिंदू हा आशिया खंडात न राहता आफि‘का खंडात किंवा मध्य पूर्वेत राहण्याची शक्यता मोठी दिसते. त्यामुळे या परिस्थितीत आपल्या देशाला या प्रकारच्या युद्धाची झळ लागू नये आणि लागलीच तर ती कमीत कमी राहावी याची काळजी आजचे केंद्रात विराजमान असलेले मोदी सरकार नक्कीच घेईल. परंतु या देशाला वा हिंदू समाजाला खरा धोका हा देशाबाहेरून नसून देशांतर्गत आहे. al-aqsa-war-gaza मागील आठवड्यात भारतातील काही तथाकथित प्रतिष्ठित पुरोगामी, पण जनमानसावर कोणत्याही प्रकारची पकड नसलेले, लोकांच्या विस्मृतीत गेलेले, काही लोक दिल्लीला पॅलेस्टाईन दूतावासासमोर आमचा पॅलेस्टाईनला म्हणजे पर्यायाने हमासला पाठिंबा आहे, हे दर्शविण्यासाठी गेले होते. भारत-पाकिस्तान सामन्यात ‘जय श्रीराम’चे नारे लावणे म्हणजे धर्मांधता असे म्हणणारे महाभागदेखील याच देशात मंत्रिपदी विराजमान असतात. टिपू सुलतानचे मोठ्ठे पोस्टर लावून त्याचे उदात्तीकरण करणारे महाराष्ट्रात दिसतात. या महाराष्ट्राच्या मातीत आमच्याच पूर्वजांनी ज्याला जमिनीत गाडला तो औरंगजेब आज काही लोक सुफी संत म्हणून नावाजतात. al-aqsa-war-gaza यावरून आम्हाला धोका देशाबाहेरून नव्हे तर देशाच्या आतूनच आहे, याची हिंदूंनी खूणगाठ बांधून घेतली पाहिजे.
 
 
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे स्तोम माजवत या देशात इस्लामिक अतिरेक्यांना (हमासला) पाठिंबा देणार्‍यांना आज स्पष्टपणे खडसावणे गरजेचे झाले आहे. अजूनही आमच्या देशात गैरमार्गाने आश्रयासाठी आलेल्या बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर काढण्यासाठी योग्य ती कारवाई होत नाही. या सगळ्या परिस्थितीत पहिल्या प्रथम हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान या देशातून बाहेर काढले गेले पाहिजेत. al-aqsa-war-gaza हे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान सहजपणे ओळखता येतात. तेव्हा हिंदू समाजाने त्यांच्यावर सर्वप्रथम बहिष्कार टाकला पाहिजे. त्यांना इथे पोटापाण्याला न मिळाले तरच ते या देशातून बाहेर जातील. हरप्रयत्नाने यांना देशाबाहेर घालवणे गरजेचे आहे. कारण उद्या जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या देशात निर्माण झाला तर हिंदू समाज आणि भारतीय प्रशासनाविरोधात विद्रोह करणारा पहिला जनसमूह हाच असणार आहे. al-aqsa-war-gaza या देशात आज अस्तित्वात असलेले मुस्लिमधार्जिणे असे काही कायदे रद्द करणे हेही अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.
 
 
प्लेसेस ऑफ वरशिप अ‍ॅक्ट, वक्फ अ‍ॅक्ट व बोर्ड आणि मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मायनॉरिटीज कमिशन यांसारखे कायदे रद्द होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी पुरेसा सामाजिक दबाव निर्माण होताना दिसत नाही. केंद्र सरकारने जरी हे कायदे रद्द केले तरी या कायद्याची आवश्यकता नाही तसेच हे कायदे धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला बाधा आणणारे आहेत, याची सर्वोच्च न्यायालयाला जाणीव होण्यासाठी या विषयावर सातत्याने सामाजिक अभिसरण होणे गरजेचे आहे. al-aqsa-war-gaza अगदी यासाठीदेखील दबाव गटाची आवश्यकता असते आणि आहे. जगात जेव्हा अस्थिर परिस्थिती आहे, आधीच बदनाम असलेला जागतिक इस्लाम जेव्हा यहुदींशी लढण्यात गुंतला आहे तेव्हाच आपले इप्सित साध्य करणे म्हणजेच भगवंताने आपल्याला महाभारत युद्धात घालून दिलेला धडा गिरवणे नव्हे का?
 
९८८१२४२२२४
Powered By Sangraha 9.0