जिल्ह्याला नुकसानीच्या यादीतून का वगळले?

पालकमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार
आ. यशोमतींचा सवाल व आरोप

    दिनांक :01-Dec-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अमरावती,
MLA Yashomati Thakur : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळं नुकसान झालेल्या 22 जिल्ह्यांच्या प्राथमिक यादीतून अमरावती जिल्हा वगळण्यात आला आहे. या प्रकारामुळं काँग्रेस नेत्या आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शुक्रवारी 1 डिसेंबरला या प्रकारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जबाबदार धरले. दुसर्‍या जिल्ह्यातील मंत्र्यांना लांबच्या जिल्ह्यांच पालकत्व दिल की असंच होणार, असे ठाकूर MLA Yashomati Thakur म्हणाल्या.
 
MLA Yashomati Thakur
 
सरकारचे शेतकर्‍यांकडं पूर्ण दुर्लक्ष आहे. संपूर्ण राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळं नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांची पिक उद्ध्वस्त झाली आहेत. सरकारने 22 जिल्ह्यातील प्राथमिक नुकसानीची आकडेवारी अहवालात दिली आहे. परंतु, त्यात अमरावती जिल्ह्याचा समावेशच नाही. अमरावतीला वगळण्यात आले, असे ठाकूर MLA Yashomati Thakur म्हणाल्या.
 
 
राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये 3 लाख 93 हजार 325 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा आकडा बराच मोठा आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या यादीत पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ व पूर्व विदर्भातील गडचिरोलीचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्याला यातून का वगळ्यात आले, असा सवालही त्यांनी केला. अमरावती जिल्ह्यातील पंचनाम्यांची कार्यवाही अद्याप अपूर्ण आहे का? ती पूर्ण झाली नसेल तर प्रशासनावर मंत्र्यांचा कोणता वचक आहे, असा प्रश्नही MLA Yashomati Thakur त्यांनी उपस्थित केला.
 
 
अमरावतीचे दुर्दैव आहे की, जिल्ह्याला दूरवरचे पालकमंत्री मिळाले आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील सगळ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत. अधिकार्‍यांवर त्यांचा वचक नाही. अशात मंत्र्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या करावी का, अशीच सरकारची इच्छा आहे का? असा संताप त्यांनी व्यक्त केला. नागपूर येथे होणार्‍या हिवाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न विचारणार असल्याचेही आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर म्हणाल्या. मदत न मिळाल्यामुळे अमरावती जिल्ह्यात एकही शेतकरी आत्महत्या झाली, तर आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. सरकारजवळ शेतकर्‍यांना देण्यासाठी पैसा नाही. त्यामुळे ते थातूरमातूर पंचनामे करून एखादे पॅकेज देऊन मोकळे होऊ शकते. आम्हीही नुकसानीची माहिती घेतोय. त्यात मोठी तफावत आढळल्यास आम्ही सरकारला योग्य त्या प्रमाणात नुकसानभरपाई देण्यास बाध्य करू, असेही आ. ठाकूर MLA Yashomati Thakur यांनी स्पष्ट केले.