महायुती सरकारच्या निर्णयाचा जिल्ह्यातील 42 हजारांवर कार्डधारकांना लाभ

- आ. रणधीर सावरकर, आ. वसंत खंडेलवाल यांची माहिती

    दिनांक :23-Feb-2023
Total Views |
अकोला,
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या Mahayuti government नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील भाजपा-शिवसेना महायुती सरकारने भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या पर्वावर शंभर रुपयात आनंद शिधा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.यामुळे अकोला जिल्ह्यातील 42,840 कार्डधारकांना त्याचा लाभ होणार आहे. व 3 लाख 432 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.अशी माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस व आ.रणधीर सावरकर आणि आ.वसंत खंडेलवाल यांनी येथे दिली आहे.
 
Mahayuti government
 
सरकारचा Mahayuti government हा उपक्रम आमदार गोवर्धन शर्मा यांच्यासह भाजपाचे विजय अग्रवाल, अनुप धोत्रे, किशोर पाटील, तेजराव थोरात पाटील, अर्चना मसने, कुसुम भगत, चंदा शर्मा ,रामदास तायडे, उमेश पवार, मणिराम टाले ,धनंजय धबाले, विजय हलदे ,माया कावरे ,माधव मानकर, केशव ताथोड , हिरासिंग राठोड बळीराम सिरस्कार, विजय मालोकार, चंद्रशेखर पांडे गुरुजी, शिवाजीराव देशमुख, प्रभाकर मानकर, रवि गावंडे, जयंत मसने, संजय जिरापुरे , कनक कोटक, भूषण कोकाटे, नीलेश निनोरे, अधिवक्ता देवाशिष काकड आदी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या योजनेची माहिती नागरिकांना देणार आहेत असेही सांगण्यात आले आहे.