चंदननगरचे कामगार कल्याण केंद्र नियमित सुरू करण्याची मागणी

Kamgar Kalyan Kendra-NGP केंद्र पूर्णपणे बंद

    दिनांक :01-Sep-2023
Total Views |
नागपूर,
 
Kamgar Kalyan Kendra-NGP चंदननगर वस्तीमध्ये कामगारांच्या कल्याणासाठी 40-45 वर्षांपूर्वी कामगार कल्याण केंद्राचा प्रारंभ करण्यात आला. या केंद्रामध्ये कामगारांच्या कुटुंबांकरिता नाटक, क्रीडा स्पर्धा आदी मनोरंजनाचे आणि कुटुंब कल्याणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वर्षभर घेतले जात असत. Kamgar Kalyan Kendra-NGP येथे सर्वसामान्यांना वाचनासाठी वर्तमानपत्रे उपलबध होत असत आणि ग्रंथालयाचीही सोय होती. विविध विषयांवरील पुस्तके येथे वाचनासाठी उपलब्ध व्हायची. Kamgar Kalyan Kendra-NGP लहान मुलांना शिकविण्यासाठी अंगणवाडीचा सुद्धा उपक्रम याच परिसरात चालू आहे.
 
 


Kamgar Kamgar Kalyan Kendra-NGPKalyan Kendra-NGP
 
 
परंतु काही दिवसांपूर्वी केंद्राच्या छतातून पावसाचे पाणी गळत असल्याचे कारण देऊन समाज कल्याण विभागाने चंदननगरातील कामगार कल्याण केंद्र पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Kamgar Kalyan Kendra-NGP हा निर्णय चंदननगर, वकीलपेठ, उंटखाना, सिरसपेठमधील कामगारांना व त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना मान्य नाही. त्याबद्दल सर्वत्र नाराजी पसरली आहे. चंदननगरचे महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र बंद न करता, ते नियमित चालू ठेवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या Kamgar Kalyan Kendra-NGP कामगार कल्याण केंद्राच्या उभारणीसाठी कामगारांचा पैसा लागला आहे, याकडेही नागरिकांनी लक्ष वेधले आहे. नागरिकांच्या मागणीची सरकारने त्वरेने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
सौजन्य : राजेश हरडे, संपर्क मित्र