कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी कार्यशाळा

30 Jan 2024 20:59:51
- कापूस उत्पादन क्षमता वाढीसाठी विशेष कापूस प्रकल्प

यवतमाळ, 
भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत केंद्रीय कापूस संशोधन संस्था व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, 25 जानेवारी रोजी येथील कृषी विज्ञान केंद्र येथे अतिसघन कापूस लागवड प्रकल्पांतर्गत शेतकरी कार्यशाळा पार पडली. विदर्भातील प्रमुख पीक कापसाच्या उत्पादन क्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभुळगाव, दारव्हा आणि आर्णी तालुक्यात विशेष कापूस प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामध्ये कापसाच्या उत्पादन वाढीसाठी सघन व अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांपर्यत प्रचार-प्रसार व्हावा, या दृष्टीने या Krushi Karyashala कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नरेंद्र पार्लावार होते.
 
 
Krushi Karyashala
 
Krushi Karyashala : तसेच वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, कीटकशास्त्र विशेषज्ञ डॉ. प्रमोद मगर, अभियांत्रिकी विशेषज्ञ राहुल चव्हाण, विस्तार शिक्षण विभागाचे डॉ. मयूर ढोले, स्नेहलता भागवत, प्रतीक रामटेके, लखन गायकवाड, राधेश्याम देशमुख, शिवानी बावणकर, प्राची नागोसे, रवींद्र राठोड, नयन ठाकरे, भरत राजपूत, शंतनू देशकर, नंदकुमार मेश्राम उपस्थित होते. डॉ. नरेंद्र पार्लावार यांनी कापूस पिकाचे कमी खर्चिक व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रमुख तांत्रिक सत्रात डॉ. सुरेश नेमाडे यांनी शेतकर्‍यांना कापूस पिकाच्या लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती दिली. लागवडीसाठी योग्य अंतर व मूलभूत अन्नद्रव्य व्यवस्थापनामुळे बोंडांची संख्या व आकार वाढवून उत्पादनात वाढ होते आणि मातीच्या प्रकारानुसार शेतकर्‍यांनी कोणते लागवड अंतर निवडावे याबाबत मार्गदर्शन केले.
 
 
या Krushi Karyashala शेतकरी कार्यशाळेची प्रस्तावना करताना डॉ. प्रमोद मगर यांनी या प्रकल्पाचा उद्देश, अतिसघन कापूस लागवड तंत्रज्ञान शेतकर्‍यांना कशा प्रकारे फायदेशीर होईल व कृषी विज्ञान केंद्रामार्फत या तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या कार्याची विस्तृत माहिती दिली. तसेच तांत्रिक सत्रामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि कापूस पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या अतिसघन कापूस लागवड पद्धतीमध्ये न्यूमॅटिक प्लॅन्टरचा वापर शेतकर्‍यांसाठी फायदेशीर ठरत असल्याबद्दल माहिती देताना शास्त्रज्ञ राहुल चव्हाण म्हणाले, या यंत्राचा वापर करून बी योग्य खोल अंतरावर अचूकपणे सोडण्यास मदत होते. तसेच एकसमान रोपे उगवतात आणि पेरणीसोबत प्रारंभिक खताचा पुरवठा करणेदेखील शक्य होते. शेतकर्‍यांनी आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरणाची साथ घेण्याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
Powered By Sangraha 9.0