अति महत्वाकांक्षी व निष्क्रियांना घरी बसवा

कॅबिनेट मंत्री आत्राम यांचे टीकास्त्र

    दिनांक :22-Oct-2024
Total Views |
अहेरी
booth committee training camp यापूर्वी संधी देऊनही कोणतीच कामे न केल्याने निष्क्रिय नेत्यांना आणि अती महत्वाकांक्षेत, अतिउत्साहात घाई करणार्‍यांना त्यांची जागा दाखवून घरी बसवा, असे टीकास्त्र कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विरोधकांवर सोडले.अहेरी येथील booth committee training camp  वासवी हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) मंगळवार रोजी बूथ कमिटी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, श्रीकांत मद्दीवार, सांबय्या करपेत, सुरेंद्र अलोणे, कैलास कोरेत आदी उपस्थित होते.
 
  
booth camp
 
 
 पुढे बोलताना मंत्री आत्राम म्हणाले की, मागील तब्बल ५० वर्षांपासून मी जनसेवेचे व्रत हाती घेतले असून अविश्रांत कार्य करीत आहे. निष्क्रिय असणार्‍यांना घरी बसवा असे म्हणत माजी राज्यमंत्री अंब्रीशराव महाराज यांच्यावर तर अती महत्वाकांक्षेत व उत्साहात अतीघाई करणार्‍या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्यावर टीकास्त्र सोडून अन्य विरोधकांवरही घणाघाती आरोप केले.
यावेळी, रविंद्रबाबा booth committee training camp आत्राम, पुष्पा अलोणे, सुरेंद्र अलोणे, आलापल्ली ग्रापंचे सरपंच शंकर मेश्राम, सांबय्या करपेत आदींनी आपले विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे बूथ कमिटी प्रशिक्षण शिबिराचे औचित्य साधून विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागेश मडावी यांनी केले. संचालन रियाज शेख तर आभार कैलास कोरेत यांनी मानले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ कमिटीचे सदस्य, अहेरी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.