नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम : अंब्रीशराव आत्राम

    दिनांक :17-Feb-2024
Total Views |
अहेरी, 
Dance Competition : आपल्या भागातील युवावर्गाच्या अंगी अनेक सुप्त गुण लपले असून, त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याचे काम राज्यस्तरीय समूह नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आलापल्लीत या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या व्यासपीठाचा कलाकारांनी जास्तीत जास्त संख्येने फायदा घेण्याचे आवाहन माजी पालकमंत्री राजे अंब्रीशराव आत्राम यांनी केले. आलापल्ली येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर एम.डी बहुउद्देशीय शिक्षण व विकास संस्थेद्वारा आयोजित राज्यस्तरीय समूहनृत्य व लावणी स्पर्धेच्या उद्घाटनरप्रसंगी ते बोलत होते.
 
 
JK;LFKF
 
 
 
यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच शंकर मेश्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 37 बटालियनचे कमांडंट एम. एच. खोब्रागडे, पोलिस निरीक्षक मनोज काळबांधे, आलापल्ली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, ग्रामकोष समितीचे अध्यक्ष दीपक तोगरवार, माजी जिप सदस्य विजया विठ्ठलानी, सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश शेंडे, संगीता बुरांडे, अज्जू पठाण, गिरीश मद्देर्लावार, अमोल कोलपाकवार, शकुंतला दुर्गम, नृत्य स्पर्धेचे परिक्षक मोहन, नंदू गुरंग, दीपा गुरंग, अँकर शंकर, स्पर्धेचे आयोजक रफिक पठाण व पत्रकार मिलिंद खोंड उपस्थिती होते.
 
दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचे आयोजक रफिक पठाण व मिलिंद खोंड यांनी अंब्रीशराव आत्राम यांचे पुष्पहाराने स्वागत केले. यावेळी गडचिरोली येथील महा मॅरेथॉन मध्ये 5 कि. मी. विजेत्या अंकिता मडावी व निकिता मडावी यांचा माजी पालकमंत्री अंबीशराव आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
विविध ठिकाणाहून आलेल्या नृत्यांगनाचे कलाविष्कार बघण्यासाठी रसिक प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळली होती. या स्पर्धेत एकल लावणी प्रकारात प्रथम बक्षिस सुगीत उराडे तर द्वितीय प्रतीक भैसारे यांनी तर समुह नृत्य स्पर्धेत प्रथम तळोधी येथील भवानी ग्रुप, द्वितीय चंद्रपूर येथील इलेक्ट्रो ग्रुप तर तृतीय बल्लारशा येथील नवरंग ग्रुपने पटकाविले. समूह लावणीमध्ये नागपूर येथील जुडवा ग्रुप प्रथम तर एस.आर .ग्रुप ने द्वितीय पारितोषिक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा शिल्ड व रोख बक्षिसे देण्यात आली. संचालन शंकर व सुहासिनी बागडे यांनी तर आभार मिलिंद खोंड यांनी मानले.