वनोजा पिंजर रोडवरील तो पूल देत आहेत अपघातास निमंत्रण

-संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष -दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण

    दिनांक :26-May-2024
Total Views |
मंगरुळनाथ, 
accidents वनोजा पिंजर मुख्य रोडवरील फाटा ते वनोजा गावादरम्यान असलेला पाचमोर्‍या पूल व येथून काही अंतरावर असलेला एकमोर्‍या पुलाला एका काठावर मोठे भगदाळ पडले आहे. त्यामुळे हे पूल अपघातास निमंत्रण देत आहेत. संबंधित विभागाकडून दरवर्षी याची दुरुस्ती करण्यात येते. परंतु ही दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्याने, पुन्हा जैसे थे ची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे हा थातूरमातूर दुरुस्ती करून बिले काढण्याचा प्रकार असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.
 

dgdfg 
 
पावसाळ्यात थोडाही जास्त पाऊस पडला की या पुलासह लेंडी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहते. त्यामुळे वनोजा ते पिंजर कडे जाणारी वाहतूक प्रभावित होते. तसेच पूल लहान असल्याने शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जात असून, शेतातील पिके पाण्यात जातात त्यामुळे शेतकर्‍यांचेही नुकसान होते. या रस्त्याने शेकडो दुचाकी व प्रवाशी वाहतूक करणारे अनेक वाहने त्याच बरोबर शेती उपयोगी असणार्‍या वाहनांची वर्दळ नेहमी असते.accidents शेलुबाजार येथे मोठी आठवडी बाजारपेठ व कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे पिंजर पासून येणार्‍या सर्व खेडे गावातील प्रवासी शेलुबाजारला जाण्यासाठी याच रस्त्याने प्रवास करतात. वनोजा येथे शाळा, महाविद्यालय, निवासी वस्तीगृह, प्राथमिक आरोग्य केंद्र, संस्था, पतसंस्था, बँक आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची वाहतूक सुरू असते. यामुळे या पुलांची उंची वाढवून नव्याने निर्मिती करण्यात यावी. अशी मागणी परिसरातील नागरिकांन मधून होत आहे.

या रस्त्यावरील एकमोर्‍या पूलाचा एका भागाला मागील वर्षी मोठे भगदाळ पडले आहे. त्याची संबंधित विभागाकडून थातूरमातूर दुरुस्ती केल्या जाते. त्यामुळे परत जैसे ती परिस्थिती निर्माण होते. आत सुद्धा पुलाच्या एका बाजूला मोठे भगदाड पडले असून येथे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळ्यात थोडा जास्त पाऊस झाल्यास पूल व्यवस्थित नसल्यामुळे आमच्या शेतात पाणी जाते त्यामुळे शेतातील पीक खराब होते.
सचिन राऊत, शेतकरी वनोजा
 
 

हे दोन्ही पुल पूर्णपणे जीर्ण झाले असून, एक मोर्‍या पुलाला मोठे मोठे भगदाड पडले आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्यामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यास त्याला संबंधित विभाग जबाबदार असेल.