प्रासंगिक
- राहुल गोखले
CPM-Thrissur-Politics विचारधारेचे कितीही अवसान आणले तरी सत्तेची लालसा तडजोड करण्यास कशी भाग पाडते, हे पाहायचे असेल तर केरळातील त्रिशूर येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची (सीपीएम) झालेली अवस्था हे त्याचे ज्वलंत उदाहरण ठरेल. त्रिशूर महापालिकेत डाव्या आघाडीची सत्ता आहे. CPM-Thrissur-Politics या आघाडीत सीपीएमबरोबरच भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) देखील सामील आहे. या आघाडीला राज्यात सलग दोनदा सत्ता मिळाली असली, तरी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत आघाडीने (युडीएफ) डाव्या आघाडीचा धुव्वा उडविला. मात्र त्याहून लक्षवेधी भाग म्हणजे भाजपाला केरळात लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मिळालेले यश. CPM-Thrissur-Politics अभिनेता सुरेश गोपी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार होते तसेच २०२१ च्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. दोन्ही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा : तेल टँकर समुद्रात उलटला...भारतीयांसह १६ क्रू मेंबर्स बेपत्ता
हेही वाचा : चार बड्या नेत्यांनी राष्ट्रवादी का सोडली? आता अजितदादाचं काय होणार?मध्यंतरीच्या काळात गोपी यांच्यावर डाव्यांनी काही निरर्गल आरोप केले; तरीही भाजपा गोपी यांच्या पाठीशी उभा राहिला. यावेळी गोपी खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले. CPM-Thrissur-Politics त्यांनी याच त्रिशूर लोकसभा मतदारसंघात सीपीआयचे उमेदवार व्ही. एस. सुनील कुमार यांचा तब्बल ७५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. त्यानंतर गोपी यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात करण्यात आला. या निवडणुकीचे कवित्व तेवढ्यावरच संपले नाही. याचे कारण विजय सुरेश गोपी यांचा झाला; मात्र कलगीतुरा रंगला तो डाव्या आघाडीच्या गोटात आणि त्या वादाचा केंद्रबिदू होते तर त्रिशूरचे महापौर एम. के. व्हर्गीस! व्हर्गीस हे काही डाव्या आघाडीचे अधिकृत सदस्य नव्हते; किंबहुना ते मूळचे काँग्रेसचे. २०२० साली केरळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. CPM-Thrissur-Politics त्रिशूर महापालिकेत काँग्रेसप्रणीत आघाडी आणि डावी आघाडी यांना समसमान जागांवर विजय मिळाला. दोन्ही आघाड्यांना बहुमताने हुलकावणी दिली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सहा जागा जिंकण्यात यश आले. तेव्हा महापौर कोणत्या आघाडीचा हा प्रश्न निर्माण झाला. व्हर्गीस हे काँग्रेसचे बंडखोर म्हणून निवडणुकीत उतरले होते. तेव्हा अपक्ष म्हणून निवडून आल्यावरही ते काँग्रेसकडे परततील अशी शक्यता होतीच.
CPM-Thrissur-Politics त्रिशूर महापालिकेत आपलाच महापौर असला पाहिजे या हट्टाने डाव्या आघाडीने व्हर्गीस यांना थेट महापौरपद देण्याचे मान्य केले. सुरुवातीस व्हर्गीस यांनी हे पद आपल्याकडे पूर्ण पाच वर्षे राहावे अशी अट घातली होती. डाव्या आघाडीकडून ती मान्य होणे संभव नव्हते. याचे कारण आघाडीतील पक्षांमधील इच्छुकांना किती नाराज करणार, हा प्रश्न होता. तेव्हा व्हर्गीस यांनी आपली अट काहीशी शिथिल केली आणि तीन वर्षे महापौरपद आपल्याकडे राहावे, अशी नवीन अट घातली. तीही मंजूर झाली नाही. अखेरीस बराच खल झाल्यानंतर व्हर्गीस यांना दोन वर्षे महापौरपद आणि त्यानंतर उर्वरित काळ सीपीएम आणि सीपीआयला महापौरपद असे निश्चित करण्यात आले. CPM-Thrissur-Politics मात्र, दोन वर्षे झाल्यानंतर व्हर्गीस महापौरपद सोडण्यास राजी झाले नाहीतच; अद्याप महापौरपद त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे डाव्या आघाडीत नाराजी होतीच; आता ताजी नाराजी आहे ती व्हर्गीस डाव्या आघाडीचे महापौर असूनदेखील भाजपाचे सुरेश गोपी यांची तळी उचलत असल्याने. त्यातच सीपीआय उमेदवार सुनील कुमार यांचा पराभव झाल्याने व्हर्गीस यांना विशेषतः सीपीआयने लक्ष्य केले आहे. व्हर्गीस यांनी आघाडीच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप सुनील कुमार यांनी केला आहे.CPM-Thrissur-Politics तर, त्याच पक्षाच्या जिल्हा सरचिटणीसांनी व्हर्गीस यांनी गोपी यांचा अप्रत्यक्ष प्रचार केल्याचा आरोप केला आहे.
अर्थात आपण तसे काही केलेले नसून खासदार आणि महापौर यांच्यात असणारा हा संवाद आहे, अशी भूमिका व्हर्गीस यांनी घेतली आहे. ती सीपीआयला मान्य होणारी नाही. कारण, गोपी खासदार होण्यापूर्वीपासूनच व्हर्गीस त्यांची प्रशंसा करू लागले होते. गोपी निवडून आल्यावर त्यात भर पडली इतकेच! CPM-Thrissur-Politics लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच व्हर्गीस यांनी, खासदार होण्यासाठी काही गुणांची आवश्यकता असते आणि ते सुरेश गोपी यांच्यापाशी आहेत, असे विधान करून खळबळ माजवून दिली होती. खरे तर तेव्हापासूनच व्हर्गीस डाव्या पक्षांच्या लक्ष्यावर आले होते; मात्र व्हर्गीस यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते प्रकरण काहीसे निवळले. तथापि, त्यांची ती सारवासारव वरवरची होती, हे लपलेले नव्हते. निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तर व्हर्गीस यांनी गोपी यांची एका हॉटेलात भेट घेतली. CPM-Thrissur-Politics त्यावरून काहूर उठला तेव्हा त्रिशूरच्या विकासाच्या मुद्याविषयी ती चर्चा होती, असे स्पष्टीकरण व्हर्गीस यांनी दिले. काही दिवसांपूर्वी तर अय्यथॉल येथे झालेल्या एका कार्यक्रमात व्हर्गीस आणि सुरेश गोपी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. गोपी यांच्याकडून मतदारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत, असे सांगत व्हर्गीस यांनी गोपी यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला तर गोपी यांनी व्हर्गीस यांची मुक्तकंठाने प्रशंसा करीत त्याची परतफेड केली.
CPM-Thrissur-Politics त्यानंतर मात्र व्हर्गीस यांची महापौरपदावरून उचलबांगडी करण्याचे सूर सीपीआयमधून अधिक प्रबळ झाले. गोपी भाजपाचे आणि त्यांची प्रशंसा डाव्या आघाडीच्या महापौराने करणे औचित्यभंग करणारे आहे, अशी राळ सीपीआयने उठविली. व्हर्गीस यांना कायम ठेवले तर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आगामी निवडणुकांत त्रिशूरमध्ये तरी डाव्यांचा सुपडा साफ होईल, असे भाकीत केले. खरी गोम येथेच आहे. सीपीआयने इतका दबाव आणत असूनही सीपीएम मात्र त्यांस धूप घालण्यास तयार नाही. किंबहुना सीपीआयचे मत म्हणजे डाव्या आघाडीचे मत नाही, अशी अचंबित करणारी भूमिका सीपीएमने घेतली आहे. CPM-Thrissur-Politics यामागे विचारधारेपेक्षा सत्ता टिकविण्याचा हिशेब आहे, हे उघड आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अमेरिकेशी केलेल्या अणुकराराच्या मुद्यावरून पाठींबा काढून घेणाऱ्या डाव्यांनी तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांनाही आपल्या पक्षशिस्तीच्या रट्ट्यातून सोडले नव्हते. तत्पूर्वी ज्योती बसू यांना पंतप्रधान होण्यापासून रोखले होते. चॅटर्जी आणि बसू यांच्या तुलनेत व्हर्गीस अगदीच नगण्य. शिवाय ते काही डाव्या आघाडीचे सदस्य नाहीत की प्रसंगी त्यांचा बचाव करावा.
CPM-Thrissur-Politics मात्र, त्रिशूर महापालिकेतील समीकरणे इतकी तकलादू आहेत की व्हर्गीस यांना डच्चू दिला तर दुसèया दिवशी तेथे काँग्रेसप्रणीत आघाडीचा महापौर होईल आणि महापालिका हातची जाईल, अशी भीती सीपीएमला आहे. व्हर्गीस भाजपामध्ये प्रवेश करतील का, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू असली, तरी स्वतः व्हर्गीस यांनी त्याचे तूर्तास तरी खंडन केले आहे. त्यांनी खरोखरच भाजपामध्ये प्रवेश केला तरी तो काही औचित्यभंग नव्हे; याचे कारण ते अपक्ष आहेत. तेव्हा त्यांची बांधिलकी काँग्रेसशी नाही तशी ती डाव्या आघाडीशीदेखील नाही. डाव्या आघाडीची गरज व्हर्गीस यांना आहे त्यापेक्षा व्हर्गीस यांची गरज डाव्या आघाडीला जास्त आहे, असे चित्र आहे. CPM-Thrissur-Politics लोकसभा निवडणुकीत डाव्यांना बसलेला दणका पाहता एखादी महापालिका हातातून सहज जाऊ देण्यास सीपीएम नेतृत्व तयार असेल याची शक्यता धूसरच. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ सालच्या अखेरीस होतील. तेव्हा त्यास अवधी आहे. तोवर केरळच्या राजकारणात अनेक घडामोडी घडतील आणि नवीन समीकरणे बनतील. तोवर त्रिशूर महापालिकेत असणाऱ्या सत्तेवर उदक सोडण्यास सीपीएम तयार नाही, असे दिसते. विचारधारेवर सत्तेची लालसा कशी वरचढ ठरते, याचा प्रत्यय त्रिशूरच्या घडामोडीतून आला आहे.
९८२२८२८८१९