मोठी बातमी...उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी...90 वर ठार

02 Jul 2024 16:18:40
हातरस,
Satsang stampede उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने सत्संग आटोपून बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 27 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सीएमओने सांगितले की, त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 27 लोकांचे मृतदेह आले आहेत, त्यापैकी 25 महिलाही या अपघातात जखमी झाल्या आहेत. त्यामुळे मृतांचा आकडाही वाढण्याची शक्यता आहे. जखमींना एटा मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
khati

Satsang stampede मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदरराव मंडीजवळील फुलराई गावात भोले बाबांच्या सत्संगाच्या समारोपाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 27 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. 25 महिला आणि मुलांचे मृतदेह एटा मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले आहेत. स्थानिक लोक 50 हून अधिक मृत्यूची भीती व्यक्त करत आहेत. प्रवचनासाठी आलेले शेकडो भाविक कडक उन्हामुळे त्यांना  भोवळ आल्याचे सांगण्यात येत आहे. हातरसमधील घटनेची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अतिरिक्त मुख्य सचिव गृह दीपक कुमार यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. यासोबतच मदतकार्याला गती देण्यासाठी पोलीस प्रशासनाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून जखमींवर उपचार आदींची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0