नवी दिल्ली,
माजी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा Ashish Mishra bail आशिष मिश्राला लखीमपूर हिंसाचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. मात्र, दिल्ली किंवा लखनौपर्यंत त्यांच्या हालचाली न्यायालयाने मर्यादित केल्या आहेत. 2021 मध्ये लखीमपूर येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. या हिंसाचार प्रकरणात न्यायालयाने मागील वर्षी 25 जानेवारी रोजी आशिष मिश्राला अंतरिम जामीन दिला होता.
Ashish Mishra bail न्या. सूर्य कांत आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या न्यायासनाने शेतकर्यांनाही जामीन दिला आणि या प्रकरणाची सुनावणी वेगाने करावी, असा निर्देश सत्र न्यायालयाला दिला आहे. 117 साक्षीदारांपैकी सात जणांची साक्ष तपासण्यात आल्याचे आम्हाला कळवण्यात आले. आमच्या मते, सत्र न्यायालयाने सुनावणीचा वेग वाढवला पाहिजे. इतर कालमर्यादित किंवा तातडीची प्रकरणे प्रलंबित आहेत. प्रलंबित प्रकरणांसाठी प्राधान्यक्रम ठरवावा, असा निर्देश न्यायासनाने दिला.