हरारे,
India vs Zimbabwe Cricket Team भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे विरुद्ध पाच सामन्यांची T20 मालिका खेळत आहे. मालिकेतील दोन सामने खेळले गेले असून मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघाची कमान युवा शुभमन गिलच्या हाती आहे. दुसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेचा 100 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. अभिषेक शर्माने झंझावाती शतक झळकावत टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध 20 षटकांत 2 गडी गमावून 234 धावा केल्या. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कोणत्याही संघाची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. आता युवा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियाने 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध T20I मध्ये 229 धावा केल्या होत्या.
सर्वाधिक धावा करणारे संघ
भारत- 234 धावा
ऑस्ट्रेलिया- 229 धावा
अफगाणिस्तान- 215 धावा
न्यूझीलंड- 202 धावा
बांगलादेश- 200 धावा
भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. जेव्हा कर्णधार शुभमन गिल अवघ्या 2 धावा करून बाद झाला. मात्र यानंतर रुतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा यांनी धावा काढण्याची जबाबदारी घेतली. या दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या प्रत्येक बाजूने फटके मारले आणि ते संघासाठी सर्वात मोठे सामनाविजेते ठरले. अभिषेक शर्माने शानदार शतक झळकावताना 100 धावा केल्या. तर गायकवाडने 77 धावा केल्या. India vs Zimbabwe Cricket Team रिंकू सिंगनेही शेवटच्या षटकात चांगली फलंदाजी केली. त्याने 22 चेंडूत 48 धावा केल्या. या खेळाडूंमुळेच टीम इंडिया 234 धावा करण्यात यशस्वी ठरली. भारतीय संघाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच झिम्बाब्वेविरुद्ध 200 हून अधिक धावा केल्या आहेत. युवा संघाने हा मोठा चमत्कार घडवला आहे. यापूर्वी, टीम इंडियाचा झिम्बाब्वेविरुद्ध T20I मध्ये सर्वोत्तम धावसंख्या 186 धावा होती, जी त्याने 2022 मध्ये गाठली होती.
हेही वाचा : आप-काँग्रेसची फारकत!