- डॉ. अजिंक्य बोराडे
कोरोनानंतर चीनमधून आणखी एक विषाणू भारतात आला आहे. विषाणूचे नाव ‘Human metapneumovirus’ ‘ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस’ आहे, त्याला लोक ‘एचएमपीव्ही’ म्हणून ओळखतात. भारतात या विषाणूने दस्तक देण्याअगोदर आठवड्यापासून त्याची चर्चा सुरू होती. त्याचा पसरण्याचा वेग, मुले आणि वृद्धांवर त्याचा जास्त परिणाम होण्याची शक्यता आदींबाबत माध्यमांतून रकानेच्या रकाने भरून येत होते; परंतु या विषाणूबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असल्याने सामान्यांच्या मनात साशंकता कुणी हा विषाणू नवा आहे असे म्हणत होते, कुणी त्याचा शोध २५ वर्षांपूर्वी लागला असे सांगत होते, तर गेल्या सहा दशकांपासून हा विषाणू जगात कुठे ना कुठे आहे, असेही दावे केले जात होते.
त्यामुळे सामान्य गोंधळलेले असतानाच भारतात एकाच दिवशी पाचहून अधिक प्रकरणे आढळल्याने चिंतेचे वातावरण होते. केंद्र सरकार राज्य सरकारे ‘अॅलर्ट मोड’वर आली आहेत. कोरोनाचा अनुभव पाठीशी असल्याने सरकार कोणतेही निर्णय घाईघाईत घेणार नाही. लोकांना थाळ्या वाजवायलाही लावणार नाही. मार्गदर्शक सूचनांचा लगेच भडीमार करणार नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करतानाही फार घाबरून काही करायला आता सरकार आणि लोकांचीही मानसिकता नाही. असे असले, तरी संवेदनशील असलेल्या भांडवली बाजाराने भारतात विषाणूचे रुग्ण आढळल्याने लोटांगणच घातले. त्यामुळे गुंतवणूकदार ११ लाख कोटी रुपयांना झोपले; परंतु त्यामागे हेच एकमेव कारण नाही. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून बाजार सारखा हिंदोळ्यावर झुल्यासारखा झुलतो आहे. कधी त्याचा झोका लांब तर कधी जवळ जातो आहे. ८५ हजारांपासून खाली आल्यानंतर तो सातत्याने ७७ ते ८० हजारांच्या दरम्यान वर खाली आहे. एकूण गुंतवणूकदारांनी आता गुंतवणूक करताना जशी काळजी घ्यायची आवश्यकता असताना सार्वजनिक जीवनात वावरताना आपल्याला सर्वांना सार्वजनिक भान ठेवावे लागेल. कुणी काही बंधने आणण्याची वाट न पाहता खबरदारी घेऊन वागले, तर अशा संसर्गजन्य आजारांवर आपल्याला मात करता येईल. कोरोनाच्या साथीच्या काळात जग घाबरून घरात बसले असताना तैवान आणि न्यूझिलंडच्या राष्ट्रप्रमुख महिलांनी त्या वेळी केलेल्या उपाययोजना लक्षात घेतल्या पाहिजेत. मुले आणि वृद्धांना जपण्याचा त्यांचा मूलमंत्र आताही तितकाच उपयुक्त आहे. या दोन घटकांची प्रतिकारशक्ती अन्य वयोगटातील लोकांपेक्षा कमी असल्याने त्यांच्याबाबत काळजी घेतली पाहिजे. एक वयोगट आपला संचित आहे, तर दुसरा भविष्य आहे, याचे भान ठेवले पाहिजे.
‘Human metapneumovirus’ ‘ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस’ (एचएमपीव्ही) नवीन परंतु कोरोनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हा विषाणू हिवाळ्यात आणि थंड हवामानात वाढतो. भारतात आतापर्यंत पाच प्रकरणे समोर आली आहेत. ‘आयसीएमआर’कडून मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई, गुजरात, कर्नाटक या तीन राज्यांत असे रुग्ण आढळले आहेत. त्यातही लहान बाळांचे प्रमाण अधिक आहे. परदेशात न जाताही त्यांना ‘एचएमपीव्ही’ची लागण कशी झाली, आता स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एक इशारा देताना म्हटले आहे की, भारत श्वसन रोगांच्या संभाव्य वाढीस सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे. ‘इन्फ्लूएंझा’सारख्या आजाराच्या प्रकरणांमध्ये असामान्य वाढ नाही. भारतासह जगभरात ‘एचएमपीव्ही’ आधीच प्रचलित आहे. ‘एचएमपीव्ही’संबंधित श्वसन रोगांची प्रकरणे अनेक देशांमध्ये नोंदविली गेली आहेत. ‘आयसीएमआर’ वर्षभर ‘एचएमपीव्ही’ अभिसरणातील निरीक्षण करणे सुरू ठेवेल. अहमदाबाद आणि बेंगळुरूच्या दोन्ही मुलांना ‘ब्रॉन्कोप्न्यूमोनिया’ नावाचा न्यूमोनियाचा इतिहास होता, जो एक प्रकारचा फुफ्फुसाचा संसर्ग आहे. ‘ब्रोन्कोप्न्यूमोनिया’ फुफ्फुस आणि श्वासनलिकांमधील अल्व्होलीवर परिणाम करते. केंद्रीय आरोग्य मंत्रालय या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. ‘एचएमपीव्ही’ प्रथम २००१ मध्ये शोधला गेला आणि श्वसन सिंसिटिअल व्हायरस (आरएसव्ही) सह न्यूमोव्हिरिडे कुटुंबाचा भाग आहे. ‘एचएमपीव्ही’शी संबंधित लक्षणांमध्ये सामान्यतः खोकला, ताप, नाक बंद होणे आणि श्वास घेण्यात अडचण यांचा समावेश होतो. या आजारामुळे वृद्ध आणि अगदी लहान मुलांमध्ये फ्लू सारखी लक्षणे होऊ शकतात. एखाद्याला खोकला आणि सर्दी असेल, तर त्याने अनेक लोकांच्या संपर्कात येणे टाळावे. त्यामुळे संसर्ग पसरणार नाही. खोकताना आणि शिंकण्यासाठी रुमाल किंवा टॉवेल वापरण्याचा सल्ला दिला जातो. ‘एचएमपीव्ही’ सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करू शकत असला, तरी सामान्यतः लहान मुले, वृद्ध आणि कमकुवत रोगप्रतिकारक प्रणाली असलेल्या लोकांमध्ये त्याचा संसर्ग वेगाने होतो. ‘एचएमपीव्ही’मुळे इतर श्वसन विषाणूंप्रमाणेच अनेक गुंतागुंती होऊ शकतात. विशेषतः वरच्या आणि खालच्या श्वसनमार्गामध्ये संसर्ग होऊ शकतो. ‘एचएमपीव्ही’ संसर्ग सौम्य लक्षणांपासून गंभीर न्यूमोनिया किंवा ‘ब्रॉन्कायलाइटिस’पर्यंत असू शकतो. ‘एचएमपीव्ही’च्या संसर्गाची लक्षणे इतर श्वसनाच्या आजारांसारखी असू शकतात. दरम्यान, ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (‘एचएमपीव्ही’) मुळे, कोरोनाच्या शिखर सारखी परिस्थिती चीनमध्ये पुन्हा निर्माण होऊ लागली. रुग्णालये आणि स्मशानभूमीत गर्दी वाढत असल्याच्या बातम्या आणि ‘सोशल मीडिया’वर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे जगभराची झोप उडाली. त्याची वस्तुस्थिती किती फेक न्यूज किती याचा कोणीच विचार केला नाही. त्यामुळे जगावर भीतीचे सावट आले आहे.
‘Human metapneumovirus’ मानवी मेटापन्यूमोव्हायरस हा नवीन विषाणू नसला, तरी त्याचे स्वरूप आणि संसर्गजन्यता दिसून येत असल्याने, जर हा संसर्ग नियंत्रित केला गेला नाही, तर पाच वर्षांत आणखी एक जागतिक महामारी होऊ शकते, असा इशारा अनेक तज्ज्ञांनी दिला २०-२५ दिवसांत ‘एचएमपीव्ही’ने चीनसह जगभरातील आरोग्य संस्थांना निद्रानाशाचा विकार दिला आहे. चीनमध्ये पसरलेला हा धोकादायक व्हायरस आता भारतातही पोहोचला आहे. ‘एचएमपीव्ही’च्या जागतिक धोक्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी सर्व लोकांना प्रतिबंध करण्यासाठी उपाय करणे सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे हा फारसा गंभीर विषाणू नाही. त्याने संक्रमित झालेल्यांपैकी बहुतेक लोकांमध्ये फ्लू सारखी दिसून येतात, यामुळे दमा किंवा ब्राँकायटिसची समस्या उद्भवू शकते. कोरोना व्हायरसमध्ये उत्परिवर्तनानंतर, नोवेल कोरोना व्हायरस २०१९-२० मध्ये आला आणि त्याने जगभरात हाहाकार माजविला. असे मानले जाते की, ‘एचएमपीव्ही’मध्येदेखील काही बदल झाले आहेत; परंतु ते अधिक धोकादायक सिद्ध होण्याची भीती कमी आहे. ‘एचएमपीव्ही’ हा नवीन विषाणू नाही. तो ६० वर्षांहून काळ जगभर आहे आणि गेल्या २५ वर्षांपासून आपल्या सर्वांना त्याबद्दल माहिती आहे, असे अमेरिकेतील तज्ज्ञ सांगतात. मानवी मेटापन्यूमोव्हायरस समजून घेण्यासाठी, प्रथम दोन प्रकारचे विषाणू आहेत हे माहीत असणे आवश्यक आहे, डीएनए आणि आरएनए. मानवी मेटापन्यूमोव्हायरस हा आरएनए विषाणू आहे. डीएनए विषाणू स्थिर असतात, म्हणजे त्यांच्यात कोणताही बदल होत नाही, आरएनए विषाणूंमध्ये उत्परिवर्तन होतच असते. ‘एचएमपीव्ही’च्या नवीन उत्परिवर्तनांवरील तपशीलवार अभ्यासाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. चीनमध्ये मानवी मेटाप्युमोव्हायरसचे प्रमाण वाढण्याचे आणि मोठ्या प्रमाणात लोकांवर परिणाम होण्याचे मुख्य कारण म्हणजे कोविडच्या काळात तेथे लागू करण्यात आलेली झिरो-कोविड पॉलिसी आहे.
‘Human metapneumovirus’ : मार्च २०२० मध्ये टाळेबंदी करण्यात आली, ती डिसेंबर २०२३ पर्यंत अत्यंत कठोरपणे होती. या काळात जन्मलेली मुले ना शाळेत गेली, ना त्यांचा इतर लोकांशी फारसा संवाद किंवा संपर्क झाला. यामुळेच अशा मुलांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती निर्माण होऊ शकली नाही. त्यामुळे तेथील मुलांना या नवीन उत्परिवर्तित विषाणूंचा सध्या जास्त फटका बसताना दिसत आहे. भारतासारख्या देशात मुलांची प्रतिकारशक्ती वेळेत चांगली विकसित होते, त्यामुळे भारतात पसरण्याची किंवा गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता नाही. भारतात यापासून फारसा धोका नाही किंवा त्याला रोखण्यासाठी काही विशेष उपायांची गरज नाही. कोविडदरम्यान श्वसनाचे संसर्गजन्य रोग टाळण्यासाठी केलेले उपाय पुरेसे आहेत. ज्या लोकांना आधीपासून ‘कॉमोरबिडीटी’ आहे किंवा ज्यांना रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, त्यांना मुखाच्छादन घालण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा दिला जातो. तशी प्रत्येकाने जास्त काळजी करण्याची गरज नाही.