तभा वृत्तसेवा
पारवा,
Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील आदिवासीबहुल क्षेत्र असलेल्या घाटंजी तालुक्यातील पारवा येथे मजूरही मिळणे कठिण झाले आहे. भारत या कृषिप्रधान देशात शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे शेतीसाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. गुढीपाडवा होऊन महिना होत आला तरी शेतीकामासाठी सालगडी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सालगड्याकडून अधिकाधिक मागणी केली जात आहे. यात दुचाकी आणि मोबाईलला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सालगडी नेमताना शेतकèयांची मोठी पंचाईत होत असल्याने दिसून येत आहे. त्यातच कोणत्याही शेतमालाला योग्य बाजारभाव मिळेल याची शाश्वती नसल्याने शेती इतरांना ठेक्याने देण्याकडे शेतकèयांचा कल वाढत असल्याने चित्र परिसरात पहायला मिळत आहे.
घाटंजी तालुक्यात असलेली पारवा हे गाव आणि त्या परिसरातील अनेक शेतकèयांकडे 10 ते 20 एकरांपेशा अधिक जमीन आहे. जमिनीचे क्षेत्र मोठे असल्याने कुटुंबातील सदस्यांकडून सर्व कामे होऊ शकत नाहीत. त्यामुळे मोठ्या शेतकèयांना सालगडी ठेवणे गरजेचे असते. सध्या सालगड्यांना सुगीचे दिवस आले आहेत. ग्रामीण भागात शेतीचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होते. दरवर्षी या दिवशी शेती सांभाळण्यासाठी सधन शेतकरी सालगड्याची नेमणूक करतात. सालगड्याचे जुने आर्थिक व्यवहार पूर्ण करून नव्याने नेमणूक करण्यात येते.
पण महिना होत आला तरी शेतीकामासाठी सालगडी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सालगड्यांकडूनही अधिक मागणी केली जात आहे. पूर्वी वेळेवर पाऊस पडायचा, उन्हाळ्यातही विहीर, नद्या-नाले यांना पाणी राहायचे. शेतकरी उन्हाळी पिके घ्यायचे. परंतु अमर्यादा वृक्षतोड आणि वाढते प्रदूषण, तापमान यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत गेला. आता शेणखत मिळेना. उत्पादन वाढले, क्षमतेत घट झाली.
पूर्वी शेतकèयांकडे भरपूर गोधन असायचे. त्यापासून शेणखत, शेतात राबवण्यासाठीबैल, घरी दुग्धजन्य पदार्थांची कमी नसायची. मात्र अलीकडच्या काळात चारापाण्याची टंचाई, राखणाèया गड्याची मजुरी परवडत नसल्याने अनेक शेतकèयांनी गोधन विकले आहे. आता शेतकèयांनासुद्धा पाकिटाचे दूध विकत घेऊनच चहा करावा लागतो. शेतीसाठी आवश्यक बैलजोडीच्या किंमतीही लाखावर पोहचल्या आहेत. शेतमजुरांची कमतरता असल्याने मजुरीतही वाढ झाली आहे. बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
या सर्वांचा विचार करून वर्षभर राबराब राबून शेवटी पदरी निराशाच येते आहे. शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. कर्ज काढून शेतीसाठी खर्च केला तर निसर्गाच्या अवकृपेमुळे खर्चही निघणे अवघड झाले आहे.