भंडारा,
shadow of life be lost प्रगतीचा रस्ता जेव्हा एखाद्याच्या घरावरून किंवा आठवणींवरून जातो, तेव्हा त्या वेदना मोजता येत नाहीत. सध्या रस्ता रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. रस्ते चार पदरी होणार, वेग वाढणार... पण या वेगाच्या प्रवासात एका आजींची गेल्या चार दशकांपासूनची ‘सावली’ मात्र कायमची हिरावली जाणार आहे. आज या आजींवर हा निसर्गदत्त निवारा अन अनेक आठवणींचा ठेवा इतिहासजा होऊ नये यासाठी गयावया करण्याची वेळ आली आहे.

स्वतः रस्त्याच्या कडेला एका विशाल वृक्षाच्या आधाराने बसून, प्रसंगी उन्हाच्या झळा सहन करीत गेल्या ४० वर्षांपासून विमल बडोले नामक एक आजी कुलरसाठी लागणारे खस विकून वर्षानुवर्षांपासून अनेकांना गारवा देण्याचे काम करीत आहे. राष्ट्रीय महामार्गावर विश्रामगृहाच्या जवळ असलेल्या एका विशाल वृक्षाखाली आजी आपला छोटासा व्यवसाय करत आहे. यातूनच त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकला. shadow of life be lost दिवसभरासाठीचा त्यांचा हा निवारा अनेक आठवणींच्या ठेवा देणारा आहे. काही महिन्यांपूर्वी याच राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु झाले. असंख्य झाडांची कत्तल झाली. ज्या झाडाखाली आजी बसायच्या ते कापले गेले. मग त्यांनी शेजारी असलेल्या विशाल काय अशा कडुलिंबाच्या झाडाचा आकडा घेतला. मात्र आता त्या झाडाचे आयुष्यही अवघ्या काही दिवसांचे राहिले आहेत.
गत चाळीस वर्षांपासून ज्या झाडाच्या आसऱ्याने अनेक संकटे झेलली, कुटुंबाचा गाडा चालविला, ते झाड कापले जाणार या विचाराने आजी गर्भगळीत झाली. shadow of life be lost या झाडाने मला ऊन सोसायला शिकवलं आणि पावसापासून वाचवलं. कुटुंब चाळविण्यासाठी इथेच अर्थार्जनाचा मार्ग मला सापडला. हेच झाड निस्वार्थपणे ऑक्सिजन देऊन गेले, ते कापले जाऊ नये अशी विनवणी करताना आजींचा कंठ दाटून आला होता.
प्रशासनाने रस्ता चौपदरीकरणासाठी या झाडावर 'लाल फुली' मारली आहे. म्हणजेच हे झाड आता कापले जाणार हा विचारच आजींसाठी वेदनादायी आहे. shadow of life be lost आजींचा हा संघर्ष केवळ एका झाडासाठी नाही, तर त्या झाडाशी जोडलेल्या हजारो आठवणींसाठी आहे. विकास हवाच, पण तो अशा माणुसकीच्या आणि निसर्गाच्या खुणा जपून करता येईल का? हा प्रश्न आज आजींच्या निमित्ताने समोर आला आहे.